Posts

Showing posts from December, 2024
Image
  ज्ञान   प्रबोधिनी नवनगर विद्यालयातील इ. ७ वीच्या विद्यार्थ्यांचं ग्रामीण जीवन परिचय शिबिर नुकतंच पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील वेल्हा गावातील ज्ञान प्रबोधिनीच्या सुसज्ज वास्तूत   संपन्न झालं. चार दिवस झालेल्या या शिबिरातील एका दिवसाचं अनुभव कथन या लेखातून आपल्याला वाचायला मिळेल. शैक्षणिक सहलींप्रमाणे शिबिर हेही अनुभव शिक्षणाचं एक महत्त्वपूर्ण साधन कसं आहे; हे या लेखातून ठळकपणे लक्षात येतं. ......................................................................................... एक दिवस निवासी शिबिरातील...   सकाळी सातच्या सुमारास आमचे १३० विद्यार्थी ८ गटांमध्ये उभे राहतच होते तोवर आठ मॅक्स गाड्या शिबिर स्थळी येऊन थडकल्या. लगेचच एकेका गाडी एकेक गट ' बसवण्यात ' आला. ‘थोडाच(या शब्दावर जोर देत) प्रवास आहे रे. ऍडजेस्ट(या शब्दावर आघात देत) करून घ्या.’ अशी ' प्रेमळ ' सूचना समाधानदादा प्रत्येक गाडीतील गटाला देत होते. मुले बसताच गाडी आपल्या नियोजित गावासाठी प्रस्थान करत होती. पासली, नाळवट, जाधववाडी, बालवड अशी एकूण ८ गावे निश्चित करण्यात आली होती.   आमचं गाव होत...
  गोष्ट कर्तृत्वाची... दातृत्वाची! रतिलाल भगवानदास कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक आणि मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष मा. नितीनभाई कारिआ यांचा नोव्हेंबर महिन्यात अमृत महोत्सव साजरा झाला. कर्तृत्व आणि दातृत्व यांचा अनोखा संगम म्हणजे नितीनभाई कारिआ. अमृत महोत्सवानिमित्त त्यांच्या औद्योगिक व सामाजिक कार्याचा परिचय करून देणारा हा लेख....   संस्कारी कुटुंबातील बालपण कारिआ यांचे मूळ कुटुंब सौराष्ट्रामधील. १९१५ च्या सुमारास नितीनभाई यांचे वडील रतिलालजी हे कल्याणमध्ये आले. हेच नितीनचे जन्मगाव ठरले. घरात तो सर्वात धाकटा. त्याला एकूण पाच भावंडे. घरची श्रीमंती असल्याने बालपण लाडात गेले. वस्तूंची कमतरता बिलकुलच नव्हती. पण आईवडिलांची शिस्तही तितकीच होती. घरात नोकरदार मंडळींचा राबता असला तरी घरातील अनेक कामे मुलांना करायला लागायची. शाळेमध्ये असताना कधीच वर खर्चाला म्हणून पैसे घरच्यांनी दिले नाहीत. किराणा , भाजीपाला खरेदीसाठी पैसे दिले जायचे तेव्हा त्यातील प्रत्येक पै चा हिशोब द्यावा लागायचा. बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्यावर कडक निर्बंध होते. नितीनच्या शिक्षणाकडेही आई-वडिलांचे जातीने लक्ष...