Posts

Image
  ज्ञान   प्रबोधिनी नवनगर विद्यालयातील इ. ७ वीच्या विद्यार्थ्यांचं ग्रामीण जीवन परिचय शिबिर नुकतंच पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील वेल्हा गावातील ज्ञान प्रबोधिनीच्या सुसज्ज वास्तूत   संपन्न झालं. चार दिवस झालेल्या या शिबिरातील एका दिवसाचं अनुभव कथन या लेखातून आपल्याला वाचायला मिळेल. शैक्षणिक सहलींप्रमाणे शिबिर हेही अनुभव शिक्षणाचं एक महत्त्वपूर्ण साधन कसं आहे; हे या लेखातून ठळकपणे लक्षात येतं. ......................................................................................... एक दिवस निवासी शिबिरातील...   सकाळी सातच्या सुमारास आमचे १३० विद्यार्थी ८ गटांमध्ये उभे राहतच होते तोवर आठ मॅक्स गाड्या शिबिर स्थळी येऊन थडकल्या. लगेचच एकेका गाडी एकेक गट ' बसवण्यात ' आला. ‘थोडाच(या शब्दावर जोर देत) प्रवास आहे रे. ऍडजेस्ट(या शब्दावर आघात देत) करून घ्या.’ अशी ' प्रेमळ ' सूचना समाधानदादा प्रत्येक गाडीतील गटाला देत होते. मुले बसताच गाडी आपल्या नियोजित गावासाठी प्रस्थान करत होती. पासली, नाळवट, जाधववाडी, बालवड अशी एकूण ८ गावे निश्चित करण्यात आली होती.   आमचं गाव होत...
  गोष्ट कर्तृत्वाची... दातृत्वाची! रतिलाल भगवानदास कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक आणि मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष मा. नितीनभाई कारिआ यांचा नोव्हेंबर महिन्यात अमृत महोत्सव साजरा झाला. कर्तृत्व आणि दातृत्व यांचा अनोखा संगम म्हणजे नितीनभाई कारिआ. अमृत महोत्सवानिमित्त त्यांच्या औद्योगिक व सामाजिक कार्याचा परिचय करून देणारा हा लेख....   संस्कारी कुटुंबातील बालपण कारिआ यांचे मूळ कुटुंब सौराष्ट्रामधील. १९१५ च्या सुमारास नितीनभाई यांचे वडील रतिलालजी हे कल्याणमध्ये आले. हेच नितीनचे जन्मगाव ठरले. घरात तो सर्वात धाकटा. त्याला एकूण पाच भावंडे. घरची श्रीमंती असल्याने बालपण लाडात गेले. वस्तूंची कमतरता बिलकुलच नव्हती. पण आईवडिलांची शिस्तही तितकीच होती. घरात नोकरदार मंडळींचा राबता असला तरी घरातील अनेक कामे मुलांना करायला लागायची. शाळेमध्ये असताना कधीच वर खर्चाला म्हणून पैसे घरच्यांनी दिले नाहीत. किराणा , भाजीपाला खरेदीसाठी पैसे दिले जायचे तेव्हा त्यातील प्रत्येक पै चा हिशोब द्यावा लागायचा. बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्यावर कडक निर्बंध होते. नितीनच्या शिक्षणाकडेही आई-वडिलांचे जातीने लक्ष...
Image
  एक रोमहर्षक (स्वयंपूर्ण) लढाई... आपल्या व्हाट्सअॅप मधील काही ग्रुप तात्पुरते असतात. काम झालं की आपण ते डिलीट करतो. पण माझा एक ग्रुप काम झालं की दहा महिन्यांसाठी सुप्तावस्थेत जातो. दिवाळीच्या साधारण महिनाभर आधी तो जागृत होतो आणि भडाभडा वाहू लागतो. थोड्याच दिवसात त्याचं बारसंही होतं. जुनं नाव बदलून नवीन नाव तो धारण करतो. आणि मग ते नाव प्रत्यक्षात आणण्यासाठी २० ते २५ जणांची एक टीम जोरदार प्रयत्न करते... लेखाच्या विषयाबाबत काहीच समजत नाहीये ना ??? सांगतो. पुण्यात इतिहास प्रेमी नावाचं मंडळ आहे. प्राध्यापक मोहन शेटे मंडळाचे अध्यक्ष आहेत. या मंडळातर्फे गेली २० वर्षे दिवाळीत शिवचरित्रातील एखादी लढाई दृकश्राव्य म्हणजे ध्वनीचित्राच्या माध्यमातून पडद्यावर आणि प्रतीकृतीच्या आणि दिव्यांच्या माळांच्या माध्यामतून जमिनीवर दाखवली जाते. साधारण पंधरा बाय पंधरा फुटाची युद्धभूमी तयार केली जाते. लढाईची पार्श्वभूमी , प्रत्यक्ष लढाईचं रसभरीत वर्णन , लढाईचे परिणाम सांगणारी एक प्रेरणादायी स्क्रिप्ट शेटे सर लिहितात. त्यांच्याच भारदस्त आवाजात ती रेकॉर्ड होते. आवाजाला फोटो आणि व्हिडिओची जोड दिली जाते. ...