Posts

  आणि बुद्ध प्रसन्न झाले...!   " रोहित, अरे उठ पटकन ." एकदम दबक्या आवाजात मी रोहितला आवाज दिला . मध्यरात्रीचा दोनचा सुमार होता . रोहितचा डोळा लागला होता . माझा आवाज ऐकून हातानेच काय झाल असं त्यानं विचारलं . " पाणवठ्याच्या पलीकडच्या बाजूला काळा ठिपका दिसतोय बघ ." ताडकन उठून रोहितनं मचाणाच्या झरोक्याला तोंड लावलं . " नाही ओ . काही नाहीये . झाडाची सावली आहे ती ."  " अरे बघ ना नीट हालतोय की थोडासा ठिपका तो ." असं मी म्हणेपर्यंत ते काहीतरी हालणारं पाणवठ्याच्या त्या बाजूवरून काठाकाठाने चक्क आमच्या बाजूला आलं . चंद्रावर ढग आले होते . त्यामुळे प्रकाश मंदावला होता . डोळे फाडफाडून आमच्या समोर नेमकं काय आहे ते बघण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो . " अरे हे तर सिवेट ( civet ) आहे सर ." रोहित कुजबुजला . " म्हणजे उदमांजर ना ?" " होय होय ." उदमांजर आमच्यावर उदार झालं होतं. आता ते चक्क आमच्या मचाणाच्या दिशेनं येऊ लागलं. मचाणाच्या शिडीपाशी येऊन ते थांबलं. आमच्याकडे रोखून बघू लागलं . एकदम काळकुळकुळीत होतं. शेपटी लांब आण...
Image
  ज्ञान   प्रबोधिनी नवनगर विद्यालयातील इ. ७ वीच्या विद्यार्थ्यांचं ग्रामीण जीवन परिचय शिबिर नुकतंच पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील वेल्हा गावातील ज्ञान प्रबोधिनीच्या सुसज्ज वास्तूत   संपन्न झालं. चार दिवस झालेल्या या शिबिरातील एका दिवसाचं अनुभव कथन या लेखातून आपल्याला वाचायला मिळेल. शैक्षणिक सहलींप्रमाणे शिबिर हेही अनुभव शिक्षणाचं एक महत्त्वपूर्ण साधन कसं आहे; हे या लेखातून ठळकपणे लक्षात येतं. ......................................................................................... एक दिवस निवासी शिबिरातील...   सकाळी सातच्या सुमारास आमचे १३० विद्यार्थी ८ गटांमध्ये उभे राहतच होते तोवर आठ मॅक्स गाड्या शिबिर स्थळी येऊन थडकल्या. लगेचच एकेका गाडी एकेक गट ' बसवण्यात ' आला. ‘थोडाच(या शब्दावर जोर देत) प्रवास आहे रे. ऍडजेस्ट(या शब्दावर आघात देत) करून घ्या.’ अशी ' प्रेमळ ' सूचना समाधानदादा प्रत्येक गाडीतील गटाला देत होते. मुले बसताच गाडी आपल्या नियोजित गावासाठी प्रस्थान करत होती. पासली, नाळवट, जाधववाडी, बालवड अशी एकूण ८ गावे निश्चित करण्यात आली होती.   आमचं गाव होत...
  गोष्ट कर्तृत्वाची... दातृत्वाची! रतिलाल भगवानदास कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक आणि मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष मा. नितीनभाई कारिआ यांचा नोव्हेंबर महिन्यात अमृत महोत्सव साजरा झाला. कर्तृत्व आणि दातृत्व यांचा अनोखा संगम म्हणजे नितीनभाई कारिआ. अमृत महोत्सवानिमित्त त्यांच्या औद्योगिक व सामाजिक कार्याचा परिचय करून देणारा हा लेख....   संस्कारी कुटुंबातील बालपण कारिआ यांचे मूळ कुटुंब सौराष्ट्रामधील. १९१५ च्या सुमारास नितीनभाई यांचे वडील रतिलालजी हे कल्याणमध्ये आले. हेच नितीनचे जन्मगाव ठरले. घरात तो सर्वात धाकटा. त्याला एकूण पाच भावंडे. घरची श्रीमंती असल्याने बालपण लाडात गेले. वस्तूंची कमतरता बिलकुलच नव्हती. पण आईवडिलांची शिस्तही तितकीच होती. घरात नोकरदार मंडळींचा राबता असला तरी घरातील अनेक कामे मुलांना करायला लागायची. शाळेमध्ये असताना कधीच वर खर्चाला म्हणून पैसे घरच्यांनी दिले नाहीत. किराणा , भाजीपाला खरेदीसाठी पैसे दिले जायचे तेव्हा त्यातील प्रत्येक पै चा हिशोब द्यावा लागायचा. बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्यावर कडक निर्बंध होते. नितीनच्या शिक्षणाकडेही आई-वडिलांचे जातीने लक्ष...