#कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने...

अभ्यास देशस्थितीचा समतोल चालो... सुरुवातीला अगदी थोडक्यात युद्धाविषयी... ऑक्टोबर मेच्या दरम्यान कारगिलच्या परिसरात हिमवर्षाव सुरू झाला की सीमेवरील बहुतेक ठाण्यांंवरील सैनिक काढून घेतले जातात व उन्हाळ्याच्या प्रारंभी पुन्हा पहारे बसवले जातात. गेल्या अनेक वर्षांचा हाच प्रघात होता. पण १९९९ मध्ये मात्र पाकिस्तानने भारतीय फौजा आपापल्या ठाण्यात पोहोचण्यापूर्वीच ती ठाणी बळकावली. ४ मे रोजी मेंढपाळांंकडून ही बातमी भारतीय सैन्याला समजली आणि मग सुरू झाला एकेक इंच भूमीसाठीचा रक्तरंजित संघर्ष. यावेळी मात्र पाकिस्तानने भारतीय सैनिकांचा पराभव गृहीतच धरला होता. कारण ... १६ ते १८ हजार फूट उंचीचे सरळसोट कड्याचे उंचच्या उंच डोंगर, विरळ हवामान, प्राणवायूची कमतरता, उणे तापमान अशा परिस्थितीत पाठीवर १८ ते २० किलोचे ओझे घेऊन रात्रीच्या गडद अंधारात (कारण दिवसा माथ्यावरचा एक सैनिक खालच्या अनेक सैनिकांना भारी ठरतो.) शत्रूच्या गोळीबाराची पर्वा न करता हे डोंगर चढ...