#कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने...

अभ्यास देशस्थितीचा समतोल चालो...

सुरुवातीला अगदी थोडक्यात युद्धाविषयी... 

          ऑक्टोबर मेच्या दरम्यान कारगिलच्या परिसरात हिमवर्षाव सुरू झाला की सीमेवरील बहुतेक ठाण्यांंवरील सैनिक काढून घेतले जातात व उन्हाळ्याच्या प्रारंभी पुन्हा पहारे बसवले जातात. गेल्या अनेक वर्षांचा हाच प्रघात होता. पण १९९९ मध्ये मात्र पाकिस्तानने भारतीय फौजा आपापल्या ठाण्यात पोहोचण्यापूर्वीच ती ठाणी बळकावली. 
          ४ मे रोजी मेंढपाळांंकडून ही बातमी भारतीय सैन्याला समजली आणि मग सुरू झाला एकेक इंच भूमीसाठीचा रक्तरंजित संघर्ष. यावेळी मात्र पाकिस्तानने भारतीय सैनिकांचा पराभव गृहीतच धरला होता. 
कारण ...
          १६ ते १८ हजार फूट उंचीचे सरळसोट कड्याचे उंचच्या उंच डोंगर, विरळ हवामान, प्राणवायूची कमतरता, उणे तापमान अशा परिस्थितीत पाठीवर १८ ते २० किलोचे ओझे घेऊन रात्रीच्या गडद अंधारात (कारण दिवसा माथ्यावरचा एक सैनिक खालच्या अनेक सैनिकांना भारी ठरतो.) शत्रूच्या गोळीबाराची पर्वा न करता हे डोंगर चढायचे आणि मग लढाई करून जिंकायचे. प्रथम एकेक खंदक ताब्यात घेऊन शेवटी साऱ्याच टेकडीवर वर्चस्व प्रस्थापित करायचंं आणि लगेच संभाव्य प्रतिहल्ल्यासाठी सज्ज रहायचं. केवळ कल्पनातीत!!! 
          दरम्यान युद्ध चालू असताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचंं वाटाघाटीचंं 'निमंत्रण' पंतप्रधान वाजपेयी यांनी 'नम्रपणे' नाकारण्याचंं धाडस दाखवून सैनिकांचंं मनोबल उंचावलं. 
           अखेर मेमध्ये सुरू झालेला हा संघर्ष जुलैमध्ये थांबला; तो सर्व डोंगर पाकमुक्त करुनच. शत्रूचा मागमूसही न ठेवता. जगाच्या इतिहासात इतक्या उंचावर झालेलं आणि जिथे शत्रू मोक्याच्या व उंंचावरच्या ठिकाणी आहे: तरी जिंकलं गेलेलं हे पहिलंंच युद्ध असावं. भारताच्या या 'ऑपरेशन विजय' बद्दल एक स्तंभलेखक लिहितो, 'पराभवाच्या जबड्यातून विजय हिसकावून घेण्याची भारतीय लष्कराची ही काही पहिलीच वेळ नव्हती.'
.............
युद्ध नुकतंंच संपलंं होतंं आणि ३० जुलै रोजी आमचा कारगिलसाठीचा प्रवास सुरू झाला होता. ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाचे चार माजी विद्यार्थी मी, विक्रम प्रभुणे, अतुल दोषी आणि निखिल निफाडकर. थेट युद्धभूमीवर जाऊन सैनिकांशी, तेथील नागरिकांशी संवाद करावा; प्रत्यक्ष परिस्थितीचा धांडोळा घ्यावा या हेतूनंं आखलेला हा दौरा. या दौऱ्यातील केवळ सैनिकी अंगानंं टिपलेली ही काही क्षणचित्रे...

          ठिकाण श्रीनगरचे सैनिकी मुख्यालय - जागोजागी (जवळपास प्रत्येक चौकात) कडक तपासणी होत एकदाचे PRO मेजर पुरुषोत्तम यांच्या कार्यालयापर्यंत आम्ही पोहोचलो. कुठून आलो, काय हेतू आहे असं सगळं सविस्तर सांगितलं त्यांना. त्यांनाही उत्सुकता वाटली सगळं ऐकून. छान गप्पा झाल्या. आम्हाला कारगिलला जाण्याची परवानगी मिळावी यासाठी ते स्वतः मेजर अरवारी यांच्याकडे आम्हाला घेऊन गेले. त्यांच्याशी बोलणंं झाल्यावर तेही स्वतः आम्हाला ब्रिगेडियर साहेबांकडे घेऊन गेले. त्यांनाही आम्ही सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या राख्या दिल्या. तसेच मुलांनी, पालकांनी लिहिलेली पत्रंंही त्यांच्याकडे सुपूर्त केली. जाण्यात धोका आहे जाऊ नका असंं समजावून सांगायचा त्यांनी प्रयत्न केला. पण आम्ही तयारी दर्शवली; घरच्यांनाही पुरेशी कल्पना देऊन आलो आहोत असंं म्हटल्यावर मग आमच्या चौघांपैकी दोघांनाच (मी व विक्रम प्रभुणे) कारगिलला जाण्याची परवानगी मिळाली. त्यांनी लगेच आम्हाला ट्रान्झिट कॅम्पमध्ये रिपोर्टिंग करण्यास सांगितलेे. वेळ कमी होता. त्यामुळे मे. पुरुषोत्तम हे स्वतः आम्हाला त्यांच्या गाडीतून आमच्या निवासठिकाणी सोडण्यास आले. बहुधा त्यांना स्वतः एकदा सगळी खात्री करून घ्यायची होती. आमची माहिती तपासून बघायची होती. पण खूपच सहकार्य केलं यांनी. एकदम उमदा माणूस. 'केवळ संकटाच्या वेळी सैनिकांना आठवू नका; नेहमी आमची आठवण ठेवा,' असंं सांगायला ते विसरले नाहीत.
         झटकन आवरून, सॅक भरून, अन्य दोन सहकाऱ्यांशी त्यांच्या पुढील कामाविषयीचा संवाद करून आम्ही परत मुख्यालयात गेलो. सर्व कागदी कारवाया पूर्ण केल्या. नंतर आमची रवानगी ट्रान्झिट कॅम्पमध्ये करण्यात आली. तेथील मेसमध्ये आमचंं जेवण झालंं. त्या रात्री दोन छोटे प्रसंग घडले. 
          एका जवानानंं आपल्या मेजरकडंं दवाखान्यात डॉक्टर नसल्याची तक्रार केली. ताबडतोब त्या डॉक्टरला बोलावून घेण्यात आलंं. त्यानंं दुसऱ्या डॉक्टरवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यालाही बोलावण्यात आलंं. दोघांनाही मेजरनंं चांगलंच झापलं. आणि यापुढे एक तरी डॉक्टर दवाखान्यात असलाच पाहिजे अशी तंबी देऊनच सोडलं. थोड्या वेळानंं एका तुकडीला स्वयंपाकघरात कामासाठी येण्याचा आदेश आला. पण ती तुकडी नुकतीच एके ठिकाणावरून आली होती. त्यामुळे त्यांच्या प्रमुखानंं, 'माझ्या सैनिकांना आत्ता विश्रांतीची गरज आहे. ते आज येणार नाहीत', असं अगदी निक्षून सांगितलं. दौऱ्यापूर्वी आमच्या मनात वरिष्ठ कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या संबंधाबद्दल काही ठोकताळे होते. पण ते चुकीचे ठरले. आपल्या सैनिकांवर मुलांप्रमाणे प्रेम करणारे अधिकारी आम्हाला या दौऱ्यात भेटले.

              दुसऱ्या दिवशी कारगिलला जायचा प्रवास सुरु झाला. रस्ते खूपच अरुंद असल्यामुळे एका वेळी एकाच बाजूने वाहने जातात. त्यामुळे सैन्याच्या एकाच वेळी ६० ते ७० गाड्या निघतात. त्याला कॉन्व्हाय असं म्हंटल जातं. या प्रवासात घुमरी या ठिकाणी एक मुक्काम पडतो. प्रचंड थंडी होती तिथे. तेथील अधिक मधील तापमान आम्हाला सहन होत नव्हतंं तर उणे ३०-४० तापमानात आपले सैनिक कसे लढले असतील हाच विचार मनात सुरु होता. मला ती थंडी बिलकुल सहन होईना. आमच्याकडील पांघरूण अपुरंं होतंं त्या गारठ्यासाठी. माझी केविलवाणी अवस्था पाहून शेवटी एका सैनिकानंं त्याच्या स्लीपिंग बॅॅगमध्ये जागा दिली मला; तेव्हा कुठे डोळा लागला माझा. 

      सोनमर्गपासून कारगिलपर्यंतचा रस्ता खूपच खडतर, उंच उंच डोंगरातून गेलेला घाटरस्ता आहे. या मार्गावर कॅप्टन मोड नावाचंं एक ठिकाण आहे. या ठिकाणी शंकराचंं एक मंदिर आहे. बहुधा युद्धभूमीवर जाताना लागणारंं हे शेवटचंं मंदिर. या ठिकाणी प्रत्येक जवान एक कडक सॅॅल्यूट करतो. मग नमस्कार, प्रसाद घेऊनच पुढे मार्गस्थ होतो.

          कारगिलमध्ये हेलिपॅड, टीव्ही टॉवर, दारूगोळा कोठार, बंकर अशा सगळ्या गोष्टी आम्हाला दाखवण्यात आल्या. वरून छोटासा खड्डा वाटणाऱ्या बंकरमध्ये आरामात दहा ते बारा जण बसू शकतात असंही लक्षात आलं. कारगिलमध्ये आर्मी हॉस्पिटलमध्ये जखमी जवानांची आम्ही भेट घेतली. आमच्याकडे असणारे लाडू आम्ही तिथे दिले; परंतु त्यांची तपासणी करून मगच वाटू असंं डॉक्टरांनी सांगितलंं. तेथील अनेक जवानांनी बरे झाल्यावर घरी न जाता लगेच युद्धभूमीवर रुजू होणार असं सांगितलं.
          लाडूवरून अजून एक प्रसंग आठवला. रात्री एका जवानाशी गप्पा सुरु होत्या. त्याला आमच्याकडील फराळ दिला. पण तो काही खाईना. भूक नाही, आत्ताच जेवण झालं आहे असं म्हणाला. घरचा आहे, टेस्ट तर घेऊन बघा असंंही आम्ही सांगितलं. पण नाहीच. बोलता बोलता आम्हीच तो फराळ खाऊ लागलो. ते बघताच त्यानंं असा काही आडवा हात मारला की विचारू नका. मी आणि विक्रम काय समजायचे ते समजून चुकलो होतो.
         कारगिलमध्ये गडवाल रायफलच्या सुरेशचंद्र यांची भेट झाली. ते त्यांचा अनुभव सांगत होते. युद्ध चालू होतंं. ते बंकरमध्ये होते. अचानक तोफगोळ्यांचे मारे सुरू झाले आणि एक बॉम्ब बंकरचंं छत फोडून आतमध्ये आला. पण तो फुटलाच नाही. सगळीकडे फक्त धूर होऊ लागला. ताबडतोब ते सगळे बंकरच्या बाहेर आले. कोणालाही कसलीही इजा झाली नाही. मग ते म्हणाले, 'प्रत्येक गोळीवर,बॉम्बवर कोण मरणार हे लिहिलेलं असतं. त्याच वेळी आणि तोच जवान मरतो. त्यामुळे मरणाची भीती मी बाळगत नाही.'
          परतीच्या प्रवासात आमचा कॉन्व्हाॅॅय घुमरीच्या पुढे आल्यावर एका ठिकाणी अचानक थांबला. मार्गात अतिरेक्‍यांनी एका जुन्या कॅमेरात आरडीएक्स लावून ठेवले होते. आणि साधारण त्याच्यापासून ५० फुटांच्या उंचीवर आम्ही होतो. जवानांच्या एका तुकडीनंं ते निकामी केलं आणि मगच आमचा पुढचा प्रवास सुरु झाला.
          ब्रिगेडियर साहेबांना भेटून आपल्या विद्यालयातर्फे तयार केलेली ट्रॉफी त्यांना आम्ही भेट दिली. 
     ४\५ दिवस सैनिकांसोबत राहायला मिळालं. त्याचं जीवन अनुभवायला मिळालं. त्यांनाही कौतुक वाटत होतंं की कुणी महाविद्यालयीन युवक इतक्या दुरून आपल्याला भेटायला, आपल्यासोबत राहायला आले आहेत.
          आमच्यासोबत येऊ न शकलेल्या अतुल व निखिलने श्रीनगरमध्ये अनेक नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी गप्पा केल्या. अनेक प्रश्नांवर त्यांची मतं जाणून घेतली. दिल्लीतील निर्वासितांच्या छावणीला देखील आम्ही भेट दिली. पण त्याविषयी परत कधीतरी लिहीन.
         परतीच्या प्रवासात दिल्लीला मुक्काम होता. तेथील सैनिकी मुख्यालयात जाऊन विद्यालयाने जमा केलेला निधी सुपूर्त केला. त्या कार्यालयातून आम्हाला १५ ऑगस्टच्या कार्यक्रमाचे vip पासेस मिळाले. पंतप्रधानांंचे भाषण ऐकूनच या दौऱ्याची सांगता झाली.
          अभ्यास देश स्थितीचा समतोल चालो...अशी आपल्या प्रार्थनेतील एक ओळ आहे. असा अभ्यास करण्याचा एक मार्ग म्हणजे अशा प्रकारचे दौरे. त्यामुळे जेव्हा असे प्रसंग येतील तेव्हा आपण आवर्जून संधी घेतली पाहिजे विद्यार्थी मित्रांंनो.
....................
          कारगिलवरून येऊन बहुतेक पाच सहा महिने झाले होते. आणि अचानक सकाळी वर्तमानपत्रात एक बातमी वाचायला मिळाली. PRO मेजर पुरुषोत्तम यांची अतिरेक्यांकडून हत्या... त्यांच्या कार्यालयात घुसून (ज्या ठिकाणी आम्ही त्यांच्याशी छान गप्पा केल्या होत्या.) त्यांना मारण्यात आलंं होतंं. मला असंंही वाचल्याचंं आठवत आहे की त्यावेळी त्यांना काही पत्रकार भेटण्यासाठी आले होते. त्यांना त्यांनी प्रसंगावधान राखून बाथरूममध्ये पाठवून कडी लावून घेतली. त्यामुळे ते पत्रकार वाचले पण मेजर  मात्र अतिरेक्यांच्या गोळीबाराला बळी पडले. आजही तो माणूस अगदी जसाच्या तसा डोळ्यांसमोर उभा आहे...

शिवराज पिंपुडे 
विभाग प्रमुख,
पूर्व माध्यमिक विभाग,
ज्ञान प्रबोधिनी, निगडी.
          

Comments

  1. जून्या आठवणींना उजाळा मिळाला . खूपच वेवेगवेगळे अनुभव तू घेतलेस.असाच अनुभवसंपन्न हो.
    पराक्रमाला माझ्यावरचे अथांग नभ अपुरे आहे. मनात धग अन् मनगटात जोर आहे तोवर असे विविध अनुभव गाठीशी बांधतत बांधत शहाणे करून सोडावे सकळ जन
    ऊर्वरित आयुष्यात हा आठवणींचा खजिनाच कामी येतो प्रत्यक्षात काही करता आले नाहीतरी तरी आठवणींचे गाठोडं सोडून पाहता येते अर्थात ते खुले असावे अन् तुला ते शक्य आहे कारण लपवावे असे तुझे काहीच नसते

    ReplyDelete
  2. खूपच छान दादा! तू लिहीलेला अनुभव वाचताना अगदी कारगील ला जाऊन आल्यासारखं वाटलं. किती अभिमानास्पद अनुभव घेतलास् तू,खरंच खुप हेवा वाटला!!!

    ReplyDelete
  3. UnknownJuly 26, 2020 at 8:10 AM
    खूपच छान दादा! तू लिहीलेला अनुभव वाचताना अगदी कारगील ला जाऊन आल्यासारखं वाटलं. किती अभिमानास्पद अनुभव घेतलास् तू,खरंच खुप हेवा वाटला!!!

    ReplyDelete
  4. खूप सुंदर . सोनिकांच्या नुसत्या गोष्टी पराक्रम आपण नेहमीच ऐकतो परंतु प्रत्यक्ष अनुभूति खूप काही देऊन जातो.....

    ReplyDelete
  5. फारच भारी... हे त्यावेळी पण ऐकलेले आठवते आहे... तुमचे अनुभवकथन झाले होते….

    ReplyDelete
  6. दिव्यत्वाची जेथ प्रचीती
    तेथे कर माझे जुळती

    ReplyDelete
  7. दादा वाचताना प्रत्यक्ष कारगील मध्ये आसल्यासारखे वाटले. PROमेजर पुरूषोत्तम यांच्या बलिदानाची बातमी वर्तमान पत्रात वाचल्यावर तुम्हाला काय वाटले आसेल या गोष्टीचे खुपच वाईट वाटले.

    ReplyDelete
  8. सर, अनुभवकथन उत्तम लिहिले आहे, भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम.

    ReplyDelete
  9. नशिबवान आहात दादा, एवढ्या जवळून जवानांचे जीवन अनुभवायला मिळाले......अनुभव वाचतांना डोळ्यासमोर चित्र उभे राहिले ...खूप छान...
    .

    ReplyDelete
  10. खूप छान लिहीलंय दादा...मस्तच

    ReplyDelete
  11. कारगिल म्हटलं की विजय मतकर(कारगिल युद्धातील सैनिक)हेआठवत असत कारण आम्ही त्यांना प्रत्यक्ष जाऊन रोज भेट घेत असू.आणि आज तुम्ही सांगितलेला अनुभव वाचून तुमच्या बद्दल सार्थ अभिमान वाटतो.दादा यापुढे 26 जुलै ला विजय सर आणि शिवराज दादा यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.विजय सर सीमेवरील सैनिक तर शिवराज दादा सैनिकापर्यंत तेवढ्याच ताकदीने जाणारा एक (सैनिक)आपला माणूस.धन्यवाद.दादा तुमच्या कडून खूप काही शिकायचं आहे.जय हिंद

    ReplyDelete
    Replies
    1. फारच छान दादा ! मूर्ती लहान पण कीर्ती महान असच तुमचं काम आहे .त्याच काळात आम्ही शाहीर योगेश यांच्या बरोबर सैनिकांसमोर पोवाडे सादर केल्याचे प्रसंग आठविले . एवढ्या लहान वयात एका ध्येयासाठी घरच्यांना निर्वानीचा निरोप देऊन जायचे ही संधी गोष्ट नाही पण तुम्ही ती केली या धडसाबद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे . तुम्ही सांगितलेले सर्व प्रसंग समोर अनुभवतोय असच वाटले . मी सुद्धा चीन बॉर्डर वरील बंकर्स मध्ये घेतलेला अनुभव जागृत झाला .दादाअजून फार गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत यासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!
      💐💐💐💐💐
      - शाहीर अशोक कामथे

      Delete
  12. फारच छान! एवढे धाडस तू व तुझ्या मित्रांनी केले अभिमान वाटतो. असेच धाडसी कार्य यापुढेही होवो ही शुभेच्छा.

    ReplyDelete
  13. फारच छान! एवढे धाडस तू व तुझ्या मित्रांनी केले अभिमान वाटतो. असेच धाडसी कार्य यापुढेही होवो ही शुभेच्छा.

    ReplyDelete
  14. फारच छान! एवढे धाडस तू व तुझ्या मित्रांनी केले अभिमान वाटतो. असेच धाडसी कार्य यापुढेही होवो ही शुभेच्छा.

    ReplyDelete
  15. दादा
    खरच अगदी आम्हीही आपल्यासोबत दौरा केला असे वाटले.
    मी तो काही फिरलेला आहे
    वाचताना त्या सर्व घटनांचे चित्र आपण डोळ्यापुढे उभे केले.
    मेजर यांचे वीरमरण तर डोळ्यात अश्रु

    खूप
    भारी

    ReplyDelete
  16. दादा आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.
    खूपच छान दादा.... तुमचा थरारक अनुभव...,🙏🙏

    ReplyDelete
  17. शिवराज दादा. थरारक अनुभव. एवढ्या जवळून जवानांचे जीवन तुम्ही अनुभवले आणि तुमच्या या लिखाणामुळे ते आम्हाला अनुभवायला मिळाले.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog