Posts

#या हृदयीचे त्या भिंतींवर...

Image
 या हृदयीचे त्या भिंतींवर ...  मागच्याच्या मागच्या मे महिन्यात शाळेचं रंगकाम निघालं.  प्रत्येक वर्ग वेगळ्या रंगाने रंगवण्याचं ठरलं.  या रंगकामात मुलांचाही काही सहभाग घेऊयात असं वाटून   गेलं.  त्यासाठी प्रत्येक वर्गातील मागची भिंत न रंगवता प्रायमर   देऊन   तशीच ठेवण्यात आली.   शाळा सुरु झाली आणि या पांढऱ्या रंगानंं विविध रूपंं धारण   करण्यास सुरवात केली.  हातांच्या ठशांपासून ते फुटबॉलच्या शिक्क्यापर्यंत आणि  स्वाक्षरीपासून ते शाईच्या डागापर्यंत सर्वांनी भिंत सजू लागली.  आता काहीतरी तातडीन करण्याची गरज निर्माण झाली होती.  जम्मत घराने योजलेल्या एका कार्यशाळेच्या माध्यमातून   आभाताईंंचा परिचय झाला होताच.  ..................................................   इ. ९ वी क चा वर्ग.  वेळ सकाळी ९ ची.  वर्गातील बाकांची रचना बदलेली.  सर्व बाकं फळ्याच्या बाजूने, दाटीदाटीने.  आज फळा म्हणून मागची भिंत.  वर्गात फक्त १५-१६ मुलंमुली, आभाताई व...

#जेव्हा वीरगती जिवंत होते...

Image
अभ्यास सहल क्र. १  जेव्हा वीरगती जिवंत होते... ...अनिल दुधानी सरांनी मुलांना एका वीरगळी पाशी नेलं  आणि  ते सांगू लागले... ‘’मुलांनो ही वीरगळ पहा. याच्या सर्वात खालच्या कप्प्यात  वीरगती  प्राप्त झालेला वीर दिसतोय. हा वीर पायदळातील होता. त्याने दोन  घोडेस्वारांशी पराक्रमाने झुंज दिली. शत्रू  घोडेस्वारांच्या  हातात भाले  होते. वीराच्या हातातही भा ला होता.  वीर पराक्रमाने  लढला. पण  त्याचा शत्रू सैन्यासमोर निभाव  लागला नाही. त्याची  झुंज अपयशी  ठरली. त्याला वीरगती  प्राप्त  झाली. पण या वीराची  अवस्था नाही  चिरा नाही पण ती अशी  झाली नाही. त्याच्या  अतुलनीय शौर्याची  गाथा  वीरगळी वर कोरली गेली. राज्यासाठी  लढण्याचं-मरण्याचं  पुण्य  त्याला मिळालं. त्याला न्यायला स्वर्गातून  चार अप्सरा  आल्या.  त्यांच्या हातात चौरी होती. चौरीने वीराला  हवा  घालत अप्सरा  त्याला घेऊन स्वर्गात गेल्या. वरच्या खणा...